ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची सेवा कोलमडली

ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
विठ्ठलवाडी-कल्याण स्टेशन दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचं काम पूर्ण केलं आहे. मात्र, तरीही रेल्वेसेवा २० मिनिटांनी उशिरा सुरु आहे.

ऐन गर्दीच्या वेळी आणि महत्त्वाचं म्हणजे ऑफिसला जाण्याची गडबड असतानाच हा प्रकार घडल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *