भिवंडी वडपे बायपास रस्त्यावर कारचा अपघात

मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी वडपे बायपास रस्त्यावर इनोव्हा कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात नाशिकमधल्या चौघांचा मृत्यू झालाय.

मृतांमध्ये सासूसुनेसह तीन महिलांचा समावेश आहे. कारचा चेंदामेंदा झाला तर वाहन चालक आणि पुढील बाजूस बसलेली व्यक्ती गंभीर जखमी झालीय.

नाशिकहून ठाण्यात आलेल्या नाशिकच्या हुडा कुटुंबियांचा परत जाताना अपघात झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *