४ मार्क कमी पडल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

बारावीच्या परीक्षेत केवळ चार मार्क कमी मिळाल्याने नापास झालेल्या विद्यार्थिनीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनसमोर मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता हा प्रकार घडला. मनिषा भाऊसाहेब गायकवाड (वय १८, रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

मनिषा शिक्षणासाठी मनमाड येथे मावशीकडे राहत होती. तेथील एका महाविद्यालयात तिने बारावीचे शिक्षण घेत होती. बारावीच्या परीक्षेनंतर ती औरंगाबादला आली होती. मंगळवारी बारावीच्या परीक्षेचा निकाल होता. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास मनिषाला मावशीच्या मुलीचा मनमाड येथून फोन आला. तिने मनिषाला बारावीच्या परीक्षेमध्ये नापास झाल्याचे सांगितले. त्यावेळी मनिषा काकांच्या घरी होती. फोन आल्यानंतर मनिषाने आईला मैत्रिणीकडे जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडली. काळी वेळातच तिने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ जालन्याकडे जात असलेल्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनिषाचे वडील कंपनीत कामगार असून, आई गृहिणी आहे. तिला एक मोठी बहीण व लहान भाऊ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *