विहिरीत क्रेनचा रोप तुटला, ३ मजूर ठार

इचलकरंजीतील सांगवडे येथे विहिरीतील गाळ काढताना अचानक क्रेनचा रोप तुटल्याने झालेल्या विचित्र आणि दुर्देवी दुर्घटनेत तीन कामगार ठार झाले. त्यामुळे या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी सांगवडे येथे ही दुर्घटना घडली. संजय अण्णा पाटील या शेतकऱ्याच्या शेतात विहिर खोदण्याचे आणि त्यातील गाळ काढण्याचे काम सुरू होते. विहिरीत काही कामगार उतरून गाळ उपसून क्रेनच्या ट्रॉलीत भरत होते. ट्रॅाली भरलेला क्रेनवर जात असताना अचानक क्रेनच्या यारीचा दोर (रोप) तुटला आणि विहिरीत काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर कोसळला. त्यामुळे रामचंद्र कालोजी साळवी, भैरूलाल गंगाराम माळी आणि बाबूराव शामराव वडार हे तिन्ही कामगार जागीच ठार झाले. तर शिवाजी दत्तू पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांपैकी रामचंद्र साळवी आणि भैरूलाल माळी हे दोन्ही कामगार राजस्थानचे रहिवाशी असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा पंचनामाही करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *