२१ कलाकारांवर मधमाशांचा हल्ला, मिरजच्या नाट्यगृहातील घटना

मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिराच्या आवारात मधमाशांच्या घोळक्यानं वाराणसी, मुंबईहून आलेल्या सुमारे 21 कलाकारांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये कलाकार जखमी झाले आहेत.

जखमी असूनही या कलाकारांनी मंगळवारी रात्री कार्यक्रम सादर केला. त्या कार्यक्रमातच त्यांनी घडल्या प्रकाराचा उलगडा केला. यामुळे बालगंधर्व नाट्य मंदिरातील गैरसोयींचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *