राज्यातल्या उष्णतेच्या लाटेची स्थिती गेल्या दोन दिवसात गंभीर बनल्याचं हवामानाचा अभ्यास करणाऱ्या सतर्क या संस्थेचं म्हणणं आहे. आणखी तीन ते चार दिवस उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात उष्ण वातावरण कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
गुजरात आणि मध्यमहाराष्ट्रात अँटी सायक्लोन तयार झाल्यानं ही उष्णतेची लाट आली आहे. सामान्यपणे एप्रिल महिन्यात गुजरात आणि राजस्थानमध्ये तयार होते. यंदा मात्र ही स्थिती मार्चमध्येच तयार झालीय…
28 आणि 29 मार्चला हे अँटीसायक्लोनं गुजरात मधून उत्तर महराष्ट्रात प्रवेश केलाय. हळहळू हे अँटी सायक्लोन सारा देश व्यापणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. मात्र, हवेत एकाएकी मोठा बदल झाल्यामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात दोघांचा मृत्यू…
उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलीय.
राज्य सरकारनं सरकारी रुग्णालयांमध्ये हीट वेव्ह थेरपी सुरू केली असून यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं.
तसंच तापमान बदलामुळं स्वाईन फ्लूचंही प्रमाण वाढल्याचं सावंत यांनी सांगितलं. सकाळी १८ ते १९ डिग्री तापमान असलं. मात्र नंतर जास्त तापमान वाढत असल्याचं निदर्शनास आलंय.
रविवारी पुण्यात जाऊन आढावा घेतला असून यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केलाय.
ग्णालयात आणले होते.
त्यांच्या शरीरात 106 डिग्रीपर्यंत ताप होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी प्राथमीक माहिती समोर आली आहे. मालतीबाई शेतात फेरफटका मारायला गेल्या असतांना त्यावेळी तापमानाचा पारा हा 40 अंशावर होता.