जिवंत जाळलेल्या ‘त्या’ वडापाव विक्रेत्याचा मृत्यू

क्षुल्लक वादातून जाळून मारण्याचा प्रयत्न झालेल्या उल्हासनगरमधील वडापाव विक्रेत्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. नवी मुंबईच्या ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

चंदरलाल रामरखियानी असं त्याचं नाव आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील देवानंद फोटो स्टुडिओसमोर चंदरलाल यांचं मुंबई महालक्ष्मी वडापावचा स्टॉल होता. या दुकानासमोरच एका व्यक्तीला स्वत:ची वडापावची गाडी टाकायची होती. धंद्यावर परिणाम होण्याच्या भीतीनं चंदरलाल यानं त्याला विरोध केला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीनं महालक्ष्मी वडापाव दुकानात शिरून चंदरलाल याला जिवंत जाळले. यात तो १०० टक्के भाजला होता. सुरुवातीला सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चंदरलाल याला नंतर ऐरोलीला हलवण्यात आलं होतं. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात पोलिसांना अपयश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *