पाऊस थांबला, उकाडा वाढला

पाऊस थांबला, उकाडा वाढला

गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे हवेत निर्माण झालेला गारवा पाऊस थांबल्यानंतर एकाएकी नाहीसा झाला. बुधवारी मुंबई शहर आण‌ि उपनगरवासीयांना उकाड्याला सामोरे जावे लागले. तापमानातही दोन अंशांची वाढ झाल्याने इतके द‌विस भरून राह‌लिेल्या गारव्याची मजा लोपली.

मान्सून मुंबईत स्थ‌रिावला असून द‌विसभरात पडणाऱ्या जोरदार सरींमुळे कमाल तापमान २७ अंश तर किमान तापमान २५ अंशांपर्यंत घसरले होता. परंतु, बुधवारी एखाद-दुसऱ्या सरींचा अपवाद वगळता मुंबई शहर व उपनगरात पाऊस पडला नाही. त्यामुळे एकाएकी शहर आण‌ि उपनगरात पारा ३० अंशांपर्यंत जाऊन पोहोचला. किमान तापमानही एका अंशाने वाढले आहे. त्यातच हवेत बाष्पाचे प्रमाणही ९० टक्क्यांपर्यंत असल्याने बुधवारी दुपारपासूनच उकाडा सुरू झाला होती. दरम्यान, गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेच्या दिशेने सरकत असून त्याची तीव्रता कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *