राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात राहणार हजर

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडी कोर्टात हजर राहावे लागणार आहे. महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली, असे विधान राहुल गांधी यांनी भरसभेत केले होते. याप्रकरणावरील सुनावणीत आज आरोप निश्चिती केली जाणार आहे.
राहुल गांधींच्या या विधानावर आक्षेप नोंदवत संघाकडून भिंवडी कोर्टात मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी सोनाळे गावातील सभेत महात्मा गांधींच्या हत्येसंबंधी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रा.स्व. संघावर टीका केल्याने, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली.
संघाचे शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात 6 मार्च 2014 रोजी याचिका दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *