बाईक चोरणाऱ्या टोळीला अटक

अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अंबरनाथ पोलिसांच्या पथकानं अटक  केलीय. या तिघांकडून २६ दुचाकी हस्तगत  करण्यात आल्यायत.

अमोल साळुंखे, अजय अधिकारी आणि दिनेश भोईर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यांनी अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर, भिवंडी, वासिंद,टिटवाळा आणि आटगांव परिसरातून तब्बल २६ दुचाकी चोरल्या होत्या.

हे तिघे दुचाकींमध्ये फेरफार करून दुस-याला विकायचे. या टोळीबद्दल कळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *