स्कूल बस- ट्रकची धडक, १५ विद्यार्थी ठार

– दाट धुक्यामुळे स्कूल बस आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात १५ मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. इटा जिल्ह्यातील अलीगंज येथे  आज सकाळ हा अपघात झाला असून सुमारे ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे
उत्तर प्रदेशमध्ये कडाक्याची थंडी पडली असून धुकेही बरेच आहे. थंडीच्या पार्श्वभूमीवर शाळा काही काळ बंद ठेवण्यात आल्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरीही शाळा प्रशासनाने शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जर शाळा बंद ठेवली असती तर आजचा हा अपघात टळला असता व त्या निष्पाप मुलांचे जीव वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *