एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा  आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत. याआधी ही मर्यादा 4,500 एवढी होती.

8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर एटीएममधून दिवसाला दोन हजार रुपये काढण्याची मर्यादा ठेवण्यात आली होती. यानंतर ही मर्यादा 4,500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आणि आता पुन्हा एकदा ही मर्यादा वाढवून नागरिकांना दिलासा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *