काँग्रेसच्या जनवेदना आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवणाऱ्या राहुल गांधी यांचा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवरून चांगलाच समाचार घेतला आहे. भारताच्या पंतप्रधानांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका कधीच उपहास झाला नव्हता. तो यावेळी होत असल्याची बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली होती. हेच वक्तव्य राहुल गांधी यांनी ट्विट केले होते. स्मृती इराणी यांनी या ट्विटचा आधार घेत हे ट्विट म्हणजे श्री मनमोहन सिंग यांची चेष्टा तर नव्हे, असा सवाल केला आहे. स्मृती इराणी यावरच थांबल्या नाही तर त्यांनी सलग तीन ट्विट करून राहुल गांधी यांच्यावर टीकेचे शरसंधानच सोडले. २ जी, कोळासा घोटाळा, राष्ट्रकूल सामना घोटाळा, ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा हीच तुमची लायकी आहे का ? असा उलट सवाल केला. स्मृती इराणी यांच्या या आक्रमक ट्विटला सोशल मीडियावर हजारो लोकांनी प्रतिसाद दिला. अनेकांनी ते रिट्विट केले.