बुडत्या जहाजातून 20 कर्मचार्‍यांना वाचवण्यात नौदलाला यश

बुडत्या जहाजातून 20 कर्मचार्‍यांना वाचवण्यात नौदलाला यश

मुंबईजवळच्या समुद्रात बुडणार्‍या एका जहाजावरच्या 20 कर्मचार्‍यांची भारतीय नौसेने थरारकपणे सुटका करण्यात आली आहे. जिंदल कामाक्षी या खाजगी जहाजातून 20 कर्मचार्‍यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

वसईपासून 80 कीलोमीटर खोल आणि 40 नॉटीकल मैलावर समुद्रात जिंदाल कामाक्षी जहाजात काल रात्री काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे जहाज मध्येच बंद पडले. हे जहाज मुंबई बंदरात येत होते. पण उधाणलेल्या समुद्रात मध्येच बंद पडल्यामुळे आपत्कालीन परीस्थीती निर्माण झाली. त्यानंतर नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले. मात्र, रात्री पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.

त्यानंतर लगेचच नौसेनेनं सीकिंग हेलिकॉप्टर आणि आयएनएस मुंबई या लढाऊ विमानाच्या मदतीने जहाजातील कॅप्टनसह 20 कर्मचार्‍यांना नौदलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. या सर्व कर्मचार्‍यांना कुलाबा इथल्या INS शिक्रा या नौदलाच्या तळावर आणण्यात आलं आहे. तसंच बंद पडलेलं जहाज भरकटू नये यासाठी नौदलाने एक बोट ही तैनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *