मध्य रेल्वेवरील गोंधळाचे सत्र अद्याप सुरू असून दिवसेंदिवस प्रवाशांच्या मनस्तापात भर पडत चालली आहे. ठाकुर्ली स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या बिघाडामुळे अप व डाऊन मार्गावरील वाहतूक खोळंबली असून गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. चाकरमान्य कामावर जायला निघालेले असताना, ऐन गर्दीच्या वेळीच हा बिघाड झाल्याने रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.