सरकार मराठा आरक्षणासाठी सज्ज: मुख्यमंत्री

आम्हाला शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा आहे. मात्र, कोणीतरी चुकीच्या गोष्टी पसरवत समाजात तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, सरकार मराठा आरक्षणाबाबत सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आज न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी सरकारने वेळ मागितला नाही, तर याचिकाकर्त्यांनी वेळ मागितली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चुकीच्या गोष्टी पसरवायच्या, भडकवणारी वक्तव्ये करायची, समाजात तेढ निर्माण करायची, हे योग्य नही. सरकार सर्व समाजाचा विचार करत आहे, त्यामुळे एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुद्ध भूमिका घेऊ नये. आम्हाला शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा आहे. शाहू, फुले, आंबेडकरांना अपेक्षित असे वर्तन सगळ्यांकडून व्हावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले.
मराठा संघटनांशी चर्चा झाली आहे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चुकीच्या गोष्टी पसरवायच्या, भडकवणारी वक्तव्यं करायची, समाजात तेढ निर्माण करायची, हे योग्य नसल्याचंही ते म्हणाले. सरकार सर्व समाजाचा विचार करत आहे, त्यामुळे एका समाजाने दुसऱ्या समाजाविरुद्ध भूमिका घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *