केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चार राज्यांच्या प्रतिनिधींशी सीमेवरील सुरक्षेबदल संवाद साधला. राजस्थानमधील जसैलमेर येथे झालेल्या सुरक्षा बैठकीनंतर त्यांनी एक मोठी घोषणा केली. राजनाथ सिंह यांनी सांगितले की २०१८ पर्यंत पाकिस्तान बॉर्डर पूर्ण पणे सील करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्रीमती वसुन्धरा राजे या देखील बैठकीला उपस्थित होत्या.
राजनाथ सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तानबरोबरच्या बिघडत चाललेल्या संबंधांनंतर सीमेवर पूर्ण सतर्कता बाळगली जात आहे. यापुढे भारतात घुसखोरी होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
राजनाथ सिंह दोन दिवसांच्या दौर्यावर असून ते सुरक्षेचा आढावा घेत आहेत. पाकिस्तानबरोबर संबंध बिघडत चालल्याने आता भारत पाक सीमेवरील राजस्थान, गुजरात, जम्मू काश्मीर व पंजाब या राज्यांना घेऊन सुरक्षेची रणणीती आखली जात आहे.