सीमेवरील संवेदशनशील स्थिती पाहता भारतातल्या अनेक विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जयपूर, अहमदाबाद, मुंबई, दिल्ली, हैदराबाद व बेंगळूर येथील विमानतळांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
CISF चे महानिर्देशक ओ. पी. सिंह यांनी सांगितले की, अतिशय महत्त्वाच्या अशा विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबई व दिल्लीसारख्या अतिसंवेदनशील विमानतळांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सुत्रांनी सांगितले की, कोणत्याही संभावित धोक्यापासून वाचण्यासाठी बॉम्ब स्कॉड, विशेष सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सैनिकांना अलर्ट राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.