मुंबईसह संपुर्ण राज्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली आहे. मराठवाड्यातील गेल्या 6 वर्षांची पाण्याची परिस्थिती अवघ्या 6 दिवसांत बदलला आहे.
जायकवाडीतील पाणीसाठाही 66 टक्क्यांवर आला आहे आणि अजूनही जायकवाडीच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दरम्यान धरण पूर्णपणे भरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
उस्मानाबादच्या निम्न तेरणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. परभणीचे निम्न दुधना धरण92 टक्के भरले आहे. तर नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.