पावसामुळे मुंबईकर सुखावले असले तरी मुंबईतील खड्ड्यांमुळे मुंबईकरांच्या नाकी नऊ आले आहेत. खड्डे आणि त्यातच सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे.
मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवर मोठमोठे खड्डे पडलेयंत या रस्त्यावर लावलेले पेव्हर ब्लॉक सुद्धा तुटले आहेत. खड्डयांचं हे संकट कधी दूर होणार याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे