गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. पावसामुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. हार्बरवर सीएसटी-अंधेरी रेल्वे वाहतूक विस्कळीत आहे.
दरम्यान, पालघर आणि बोईसरमध्ये रुळावर पाणी साचल्याने लांब पल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला असून गुजरातकडे जाणा-या आणि गुजरातहून मुंबईकडे येणा-या गाड्यांचा खोळंबा झाला आहे.
दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात बुधवारीही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.
मुंबईच्या दिशेने येणा-या ठाण्याजवळ खारेगाव टोलनाक्याच्या येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे.