भेंडीचे उत्पादन तिन्ही हंगामांत घेता येते. हलकी, मध्यम व भारी जमिनीत भेंडी घेतली जाते. पाण्याचा निचरा होणारी जमीन यासाठी अधिक उपयोगी आहे.
भाजीपाल्याच्या शेतीत पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. एका भेंडीच्या झाडाला दिवसाला फक्त अर्धा लिटर पाणीही पुरते. व्यवसाय करत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २०१२ साली ५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. ते तातडीने फेडले. त्यानंतर २०१५ जूनमध्ये ४५ लाख रुपयांचे कर्ज व्यवसायाचा अंदाज घेऊन बँकेने दिले. वेळच्या वेळी कर्जाची परतफेड केली. शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान हवे आहे. आíथक अडचणीतून त्याला बाहेर पडायचे आहे. त्यासाठी तो धडपडतो आहे. आपल्यासोबत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आपण अधूनमधून कार्यशाळा घेतो. त्यांच्या अडचणी सोडवतो असेही त्याने सांगितले.