सागराच्या वरच्या भागातील पाणी गेल्या २० वर्षांत जास्त प्रमाणात तापत असून त्यामुळे चक्रीवादळे होतात तसेच बर्फाचा थर नष्ट होतो तसेच जागतिक हवामान बदलते असे नवीन अहवालात म्हटले आहे. आययूसीएन वर्ल्ड कॉन्झर्वेशन काँग्रेसमध्ये हवाई येथे नुकताच हा अहवाल सादर करण्यात आला. १९९५ पासून सागराचे वरच्या थरातील तापमान जास्त वाढत असून त्यामुळे जागतिक हवामानात बदल होत आहेत