आर्चीने सोडली शाळा

सैराट चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रिंकू राजगुरु म्हणजेच आर्चीने शाळा सोडल्याची माहिती आहे. सैराटमधील आर्चीच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिंकूकडे सध्या प्रचंड काम आहे.
कामात व्यग्र असल्याने शाळेत जायला तिच्याकडे वेळ नाहीय. रिंकूने १७ नंबरचा फॉर्म भरल्याचे समजतेय. दहावीला शाळेत न जाता रिंकू आता बाहेरून परीक्षा देणार आहे.काही दिवसांपूर्वी आर्ची शाळेत मर्सिडीजने गेल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.
सैराटमधून पदार्पण करणा-या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या जोडीने संपूर्ण महाराष्ट्रावर एकच गारुड केले. सैराट प्रदर्शित होऊन आता चार-पाच महिने झाले तरी, अजूनही प्रेक्षकांवरुन या चित्रपटाची मोहिनी कमी झालेली नाही. आजही रिंकू एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *