नाशिकहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक रखडली

नाशिकहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक आज सकाळपासून खोळंबली. दरम्यान, नाशिक-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने मनमाड -लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

गोरखपूर एक्स्प्रेसचे इंजिन पाडळीजवळ बंद पडले आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्यात. रोज प्रवास करणारे हजारो प्रवासी नाशिक रोड स्टेशनवर खोळंबल्यानं तिथं मोठी गर्दी झाली आहे.

इंजिन दुरूस्त करण्याचे काम सुरू असून लवकरात लवकर सेवा सुरू करण्याचे रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. पण गाड्या खोळंबल्यानं उत्तर भारतातून येणाऱ्या लाखो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *