पुणेमार्गे कोकणात जाणाऱया वाहनांना विनाटोल सोडले

स्वाभिमान संघटना आक्रमक पवित्रा घेत कोकणात जाणाऱया वाहनांना खालापूर टोलनाक्यावरून विनाटोल सोडण्याचे आंदोलन सुरू केले.

मुंबई-गोवा महामार्गाची झालेली चाळण आणि महाड येथील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालिन पुल कोसळल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या सोसाव्या लागणाऱया टोलच्या भुर्दंडातून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्याची मुक्तता व्हावी म्हणून  हे आंदोलन करण्यात आले होते.

येत्या 4 सप्टेंबरपर्यंत स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते टोलनाक्यांवर उपस्थित राहून कोकणवासियांना टोलफ्री प्रवास घडवून देणार आहेत. फक्त कोकणात जाणाऱया वाहनांनी कोकण नावाचा फलक लावावा, असे आवाहनही स्वाभिमान संघटनेचे नेते आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी तमाम कोकणवासियांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *