विषारी दारु पिल्याने झालेल्या मृत्युंमध्ये वाढ झाली असून आतापर्यंत एकूण 18 जणंचा बळी गेला आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर गोपाळगंज जिल्ह्यातील पोलिस स्थानकातील 25 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
दारुबंदी असतानाही बिहारच्या गोपाळगंज शहरात एका दुकानात दारूची छुप्या मार्गाने विक्री सुरू होती. दरम्यान या दुकानातील विषारी दारू पिल्याने आतापर्यंत 18 जणांचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मागविला आहे. बिहारचे पोलिस महासंचालक पी. के. ठाकूर यांनी अशा प्रकारच्या दोन वेगळ्या प्रकरणांमध्ये 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. तसेच सहा जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर इतर लोकांना अटक करण्यासाठी सापळा रचल्याचेही ते म्हणाले. दरम्यान गोपाळगंज जिल्हा पोलिस स्थानकातील पोलिस निरीक्षकासह एकूण 25 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.