जाधव यांचे ठाणे महापालिका वर्तुळात वजन असून, त्यांच्याशिवाय एकाही बिल्डरचे पान हलत नसल्याची चर्चा आहे; मात्र त्यांच्याकडे कॉसमॉस ग्रुपचे एकही काम नव्हते. परंतु त्यानंतरही परमार यांनी मृत्यूच्या काही तास आधी जाधव यांना फोन का केला, याचे पोलिसांना कोडे पडले आहे. त्याबाबत आणखी तपशील घेण्यासाठी जाधव यांना बोलाविण्यात आहे होते. काही वर्षांपासून जाधव वादग्रस्त असून, त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल आहेत.
डायरीतील नोंदी
पोलिसांना आढळलेल्या परमार यांच्या डायरीतील नोंदीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यात सरकारी विभागांमध्ये पैसेवाटप केल्याच्या नोंदी आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला चार लाख, एमआरटीपीला आठ लाख, म्हाडामध्ये आठ लाख, तलाठ्याला 50 हजार, शहर विकास विभागाला दोन लाख 75 हजार, एमएसईबीमध्ये 35 हजार, बिनशेती परवान्यासाठी तहसीलदारांना एक लाख 15 हजार, वृक्षप्राधिकरणाला दीड लाख, अग्निशमन विभागाला 50 हजार आणि मलनिःसारण विभागाला 25 हजार अशा नोंदी असल्याचे समजते.