मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
दरड कोसळल्याने नारायणगाव आणि जुन्नरवरून होणारी वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे. पावसामुळे पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळली. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या भाजीपाला आणि जीवना आवश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने घाटात अडकली.
माळशेज घाटात पुन्हा दोन-तीन ठिकाणी मध्यम आकाराचे दगड आणि माती रस्त्यावर आली आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने दरड हटवणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.