गर्भपात न केल्यास महिलेच्या प्रकृतीला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने २४ आठवडय़ानंतर गर्भपातास परवानगी देणारा ऐतिहासिक निकाल सोमवारी दिला.
भारतात २० आठवडय़ापर्यंतच महिलेला गर्भपात करता येतो. मात्र, महिलेच्या जीवाला असलेला संभाव्य धोका व गर्भ सदोष असल्याने न्यायालयाने कायद्यातील तरतुदी बाजूला ठेवून न्या. जे. एस. खेहार व न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने निकाल दिला.