टँकरने पाणीपुरवठ्यावर 11 कोटीवर खर्च

दुष्काळी परिस्थितीमध्ये बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारने 11,26,88000 रु.  निधी खर्च केला आहे. तीव्र उन्हाळी परिस्थितीमुळे उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे सात जिल्ह्यांतील 16 तालुक्यांतील 351 खेड्यांना व 154 तांड्याना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 74 खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे. विजापूरमधील 404, धारवाडमधील 20, गदगमधील 7 खेड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. बागलकोट, हावेरी व कारवार जिल्ह्यातील आकडेवारी उपलब्ध झाली नाही. टँकरद्वारे 10,40,785 लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यासाठी रोज 1062 टँकरचा वापर करण्यात येत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *