दुष्काळी परिस्थितीमध्ये बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारने 11,26,88000 रु. निधी खर्च केला आहे. तीव्र उन्हाळी परिस्थितीमुळे उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे सात जिल्ह्यांतील 16 तालुक्यांतील 351 खेड्यांना व 154 तांड्याना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 5 तालुक्यांतील 74 खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे. विजापूरमधील 404, धारवाडमधील 20, गदगमधील 7 खेड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. बागलकोट, हावेरी व कारवार जिल्ह्यातील आकडेवारी उपलब्ध झाली नाही. टँकरद्वारे 10,40,785 लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यासाठी रोज 1062 टँकरचा वापर करण्यात येत होता.