आगामी बांगलादेशचा दौरा भारताचा कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी मोठे आव्हान असेल असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने व्यक्त केले आहे.
‘विराटसाठी हा दौरा मोठे आव्हान असणार आहे. तो नवखा कर्णधार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत बांगलादेची कामगिरी चांगली राहिली आहेट, असे कैफ म्हणाला. जम्मू-काश्मीर पोलिस विभागाकडून आयोजित पोलीस पब्लिक क्रिकेट प्रिमियर लीगच्या उद्घाटनप्रसंगी कैफ बोलत होता.
१० जून पासून भारत आणि बांगलादेशदरम्यान पहिली आणि एकमेव कसोटी सामना सुरु होत आहे. या सामन्याचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. त्यानंतर या दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.