पाच वर्षाखालील एक कोटीपेक्षा अधिक बालकांचा दरवर्षी मृत्यू होत असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.
सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम (एसआरएस)ने केलेल्या सर्व्हेमध्ये ५७ टक्के मृत्यू हे मूल जन्माला आल्यानंतर २८ दिवसांच्या आत झाले आहेत. यातील अनेक बालकांच्या मृत्यूची कारणे ही पूर्ण दिवस न भरलेली बालके तसेच बालकांमध्ये झालेल्या संक्रमणाने झाले आहेत.
सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमने केलेल्या सर्व्हेमध्ये भारतात दरवर्षी पाच वर्षाच्या आतील १.२६ कोटी बालकांचा मृत्यू होत असल्याची नोंद केली आहे. यातील ५७ टक्के मृत्यू हे मूल जन्माला आल्यानंतर २८ दिवसांच्या आत त्यांचा मृत्यू झाला आहे. यातील यातील अनेक बालकांचा मृत्यू हा पूर्ण दिवस न भरल्याने झाला आहे.
या बालकांच्या मृत्यूची कारणे म्हणजे जन्मानंतर त्यांचे वजन कमी असणे. संक्रमण होणे, श्वासोच्छवास घेण्यात अडथळा, तसेच जन्मानंतर होणा-या विविध वेदना ही आहेत. याबाबत राज्यसभेत केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नाडा यांनी माहिती दिली.