आजपासून 3 दिवस सराफ बाजार बंद

ऑल इंडिया ज्वेलर्स अ‍ॅक्शन कमिटीच्या वतीने सोमवारपासून (ता. 25) पुकारण्यात आलेल्या तीन दिवस बंदला पाठिंबा असल्याचा ठराव कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या बैठकीत करण्यात आला.केंद्रीय अबकारी कराला विरोध करण्यासाठी दोन मार्चपासून सराफ दुकाने बंद ठेवून सराफ व्यावसायिकांनी केंद्र शासनाचा विविध आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला.

त्यातून बैठका होऊन गेल्या 12 एप्रिलला सराफी दुकाने पुन्हा सुरू झाली. यावेळी शिखर संघटना ऑल इंडिया ज्वेलर्स अ‍ॅक्शन कमिटीने सरकारला या जाचक कायद्यात सुधारणा करण्यासाठी 24 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. जरूर ती सुधारणा झाली नाही, तर पुन्हा 25 पासून दुकाने बंद करण्याचे ठरले. त्यानुसार शिखर संघटनेने 25, 26 व 27 तारखेला दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार निर्णय घेण्यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाची बैठक झाली. त्यानुसार देशव्यापी सराफ बंदला पाठिंबा देण्याचा ठराव बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बंदमध्ये सराफ व्यवसायाशी संबंधित संघटनाही संलग्‍न असल्याचे सांगण्यात आले.   यावेळी शहर अध्यक्ष सुरेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष भरत ओसवाल, उपाध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष दिनकर ससे, सुरेश ओसवाल, सचिव कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, बाबा महाडिक, महेंद्र ओसवाल, किरण गांधी, सुहास जाधव, संपत पाटील, धर्मपाल जिरगे, संजय पाटील, जितेंद्रकुमार राठोड,  सुभाष पोतदार, रूपचंद ओसवाल यांच्यासह सचिन मुसळे आणि शीतल पोतदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *