बिहारमधील नितिश कुमार सरकारने मंगळवारपासून संपूर्ण बिहार राज्यात सर्व प्रकारच्या दारूवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता बिहार हे गुजरात, केरळ आणि नागालॅण्डनंतर देशातील संपूर्ण दारूबंदी करणारे चौथे राज्य ठरले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी नितीश कुमार यांनी दारु बंदीवर मोठी मोहिम उघडणार असल्याचे आश्वासन दिले होते. तसेच राज्यात संपूर्ण दारूबंदी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. राज्याला मद्यविक्रीतून २०१४-१५ या आर्थिक वर्षात तीन हजार ७०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.
‘आता हॉटेल आणि बारमध्ये मद्याची विक्री करता येणार नाही तसेच मद्यविक्रीसाठी परवानाही दिला जाणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी मंगळवारी जाहीर केले आहे. मात्र, लष्कराच्या उपहारगृहात मद्यविक्री सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.