बालिका वधूफेम टीव्ही कलाकार प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येने सेलिब्रिटी जगात खळबळ उडाली असतानाच अभिनेत्री व भाजप खासदार हेमामालिनी यांनी याप्रकरणी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. आत्महत्या करणे हा मूर्खपणा असून त्यामुळे काहीही साध्य होत नाही! आत्महत्या करून हे जीवन संपवण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही’ असे ट्विट हेमामालिनी यांनी केले आहे. अन्य एका ट्विट्मधून हेमामालिनी यांनी मीडियावरही टीकास्त्र सोडले आहे. या अशा (आत्महत्येच्या) घटना म्हणजे भुकेलेल्या मीडियासाठी खाद्य असतात. दुसरी एखादी खळबळजनक बातमी मिळेपर्यंत या घटनांचा चावून चोथा केला जातो, मात्र त्यानंतर सगळ्यांनाच याचा विसर पडतो’ अशी टीकाही त्यांनी केली आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की या जगात झुंज देणा-यांची कदर केली जाते, हरणा-यांची नव्हे’ असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.