उच्चार चुकले म्हणून बच्चन यांच्याविरुद्ध तक्रार

उच्चार चुकले म्हणून बच्चन यांच्याविरुद्ध तक्रार

अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी कोट्यवधींचे मानधन घेतल्याची चर्चा फोल ठरल्यानंतर आता एका नव्या कारणावरून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. बच्चन यांनी राष्ट्रगीतातील काही शब्दांचा उच्चार चुकीचा केल्याबद्दल त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टी-20 विश्वकरंकड स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात 19 मार्च रोजी झालेल्या सामन्यावेळी अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत म्हटले होते. राष्ट्रगीत 52 सेकंदात संपले पाहिजे, परंतु अमिताभ यांनी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी 1 मिनिट 22 सेकंद एवढा वेळ घेतल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील अशोकनगर पोलिस ठाण्यात उल्हास पीआर नावाच्या व्यक्तीने ही तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *