जाट समुदायाच्या आंदोलनामुळे दिल्लीत पाणी संकट

हरियाणात सुरु असलेल्या जाट समुदायाच्या आंदोलनामुळे दिल्लीत पाणी संकट निर्माण झाले आहे. दिल्लीत आता पाणी शिल्लक राहिले नसल्याने सोमवारी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जाहीर केले.

मुनाक कालव्याद्वारे दिल्लीत पाणीपुरवठा केला जातो. परंतू हरियाणातील आंदोलनामुळे मुनाक कालव्याद्वारे दिल्लीत येणारे पाणी गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दिल्लीत पाणी संकट निर्माण झाले आहे. केजरीवाल यांनी पाणी जपून वापरावे असे लोकांना आवाहन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *