कन्याकुमारी-बंगळुरु एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरुन घसरून अपघात झाला. यामध्ये दहा प्रवासी जखमी आहेत. या अपघातामुळे चेन्नई-बंगळुरु मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
तामिळनाडूतील वेल्लोरे जिल्ह्यातील सोमानयाकानपट्टी आणि पाटचूर रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. या अपघातात एकूण ११ डब्यांचे नुकसान झाले. आठ डबे रुळावरुन घसरले तर तीन डबे उलटल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिरापी अनिल सक्सेना यांनी दिली.
घटनास्थळी मदत आणि बचावकार्य तात्काळ दाखल झाले असून मतदकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
रेल्वेने तात्काळ हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. ़
» मदुराई – ०४५२-२३०८२५०
» सलेम – ०४२७-२४३१९४७
» त्रिचूर – ०४८७-२४३००६०