करिश्माने पैशासाठी माझ्याशी लग्न केले : संजय कपूर

करिश्माने पैशासाठी माझ्याशी लग्न केले : संजय कपूर

बॉलिवूडमधील अभिनेत्री करिश्मा कपूर हिने माझ्याशी लग्न करताना पैशाचा विचार केला. करिश्माने पैशासाठीच माझ्याशी लग्न केले, असा आरोप संजय कपूरने केलाय.

केवळ पैशांसाठी तिने लग्नाचा घाट घातला. नंतर मोठ्या हुशारीने तिने ऐश आरामासाठी आपल्या कुटुंबाला दूर केले, असे संजय कपूरने म्हटल्याचे नवभारत टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलेय. बांद्रा कौटुंबीक न्यायालयात संजयच्यावतीने एक याचिका दाखल करण्यात आलेय. त्यात हा दावा करण्यात आलाय.

या याचिकेत म्हटलेय, करिश्माचे अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप झाले. त्यानंतर २००३मध्ये संजयबरोबर लग्न जमविले. ११ वर्षानंतर लग्न मोडले. करिश्माने पत्नी आणि सूनेची जबाबदारी निभावलेली नाही. त्यात ती यशस्वी झालेली नाही. तिने मातृत्व ठिक पद्धतीने घेतलेले नाही, याचिकेत म्हटलेय. त्यांना दोन मुलं आहेत. समायरा आणि कियान. त्यांच्या ताब्याचा मुद्दा कोर्टात सुरु आहे.

संजनने दावा केलाय की, करिश्मा मुलांचा वापर करत आहे. कारण माझ्याकडून जास्त पैसे उकळायचे आहेत. माझ्या आजारी वडिलांना भेटण्यापासून मुलांना परावृत्त केलेय. त्यामुळे मुलांवर वाईट परिणाम होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *