कांद्याला सरकारने द्यावा दोन हजार रुपये हमी भाव

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचा ठराव मंजूर
नाशिक – निर्यातशुल्क शून्य टक्के करूनही कांद्याच्या दरात पुरेशी वाढ होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने कांद्याला 2 हजार रुपये हमी भाव जाहीर करावा, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. हा ठराव शासनाला पाठविला जाणार आहे.

कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषी समितीची सभा झाली. या वेळी शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. पालखेडमधून यंदा केवळ पिण्यासाठीच तीन आवर्तने सोडली जाणार असून, सिंचनासाठी आवर्तन मिळणार नसल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आत्मा वाचवा
राज्य कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेला आत्मा प्रकल्प बंद करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. केंद्राकडून कृषी विभागाच्या योजनांसाठी 90 टक्के हिस्सा दिला जात असे; परंतु आता केंद्र शासनाने आपला वाटा कमी केल्यामुळे योजनांचा निधी कमी झाला आहे. राज्य शासनाने या योजनांसाठीचा स्वत:च्या वाट्याचा निधी देऊन आत्मा प्रकल्प सुरू ठेवावा, असाही ठराव या वेळी मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *