पुण्यात टँकरनं 6 जणांना उडवलं, तिघांचा मृत्यू

पुण्यात टँकरनं 6 जणांना उडवलं, तिघांचा मृत्यू

पुण्याच्या नारायणपूर याठिकाणी ब्रेक फेल झालेल्या टँकरनं 6 जणांना उडवलं आहे. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचा आणि एका प्रौढ व्यक्तीचा समावेश आहे.

पाण्याच्या टँकरचा ब्रेक फ्रेल झाल्यानं या टँकरनं रस्त्याच्या कडेनं चालणाऱ्या 6 जणांना उडवलं. यामध्ये 2 चिमुकले जागीच ठार झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाय अन्य 3 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

मृतांमध्ये दादा दशरथ हणवते आणि त्यांचा मुलगा आवेश दादा हणवते तर आदिती प्रविण बडदे या चिमुकलीचाही या अपघातात मृत्यू झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *