संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या १६ डिसेंबर २०१२ मधील निर्भया बलात्कार प्रकरणाला बुधवारी तीन वर्ष पूर्ण झाली. पण या प्रकरणातील आरोपीची येत्या २० डिसेंबरला सुटका होण्याची शक्यता आहे.
पिडीत मुलीच्या आई वडिलांनी आम्ही हरलो असल्याचे म्हटले आहे. ‘तीन वर्ष झाली पण अजूनही न्याय मिळालेला नाही चार आरोपींपैकी एकालाही फाशीची शिक्षा झाली नाही, असे त्यांनी सांगितले आहे.
‘आता त्या अल्पवयीन मुलाची जमिनावर सुटकाही होणार असल्याने न्याय मिळेल अशी कोणतिही आशा राहिलेली नाही, अशी भावना पिडीत मुलीच्या आई वडिलांनी व्यक्त केली. त्यांनी या आरोपीची जामिनावर सुटका करू नका, अशी मागणीही केली आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने या आरोपीच्या सुटकेला विरोध करत दिल्ली उच्च न्यायालयात सुटकेविरोधात याचिका दाखल केली आहे. येत्या २० डिसेंबरला न्यायालय या याचिकेवर निर्णय देण्याची शक्यता आहे. दरम्यान, समाजातून या प्रकरणी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.