वर्षाखेरीस ‘श्री-जान्हवी’ प्रेक्षकांना करणार अलविदा…

वर्षाखेरीस ‘श्री-जान्हवी’ प्रेक्षकांना करणार अलविदा…

गेल्या अडीच वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ‘श्री-जान्हवी आणि सहा सासवांची’ जोडी आता लवकरच निरोप घेणार आहे. डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध मालिका ‘होणार सून मी ह्या घरची’ ही मालिका बंद होणार असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले असून त्यामुळे प्रेक्षकांच्या मनाला चुटपूट लागणार आहे.
या मालिकेचा पहिला भाग २०१३ च्या जुलैमध्ये प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून सतत अडीच वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. या मालिकेने लोकप्रिय मालिकेचा टॅग मिरवत टीआरपीचाही उच्चांक गाठला. चटपटीत संवाद, उत्कंठा वाढवणारेकथानक आणि सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय यामुळे मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं.
मात्र मध्यंतरीच्या काळात कथेत घुसडलेलं पाणी, श्री-जान्हवीचा घटस्फोट, जान्हवीचे लांबलेलं बाळंतपण यामुळे मालिकेला उतरती कळा लागली आणि सोशल मीडियावरही मालिकेची चांगलीच खिल्ली उडवली गेली. जान्हवीच्या ‘काहीही हं श्री’ या डायलॉगवरून होणारे विनोद, उखाणे आजही सर्वांचे मनोरंजन करत आहे. मात्रआता लवकरच ही मालिका एका गोड वळणावर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *