चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लुर येथील पूरग्रस्त परिस्थितीचा माहिती घेण्यासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता आज (गुरुवार) या परिसराची हवाई पाहणी करणार आहेत.
मुसळधार पावसामुळे चेन्नईतील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने बुधवारी 500 पेक्षा अधिक जणांना पूरग्रस्त परिसरातून सुरक्षित स्थळी हलविले आहे. ‘पथकाने 500 पेक्षा अधिक जणांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. पूरामध्ये अडकलेल्यांकडून आम्हाला दूरध्वनी आणि संदेश मिळत आहे. आमचे पथक त्यांना प्रतिसाद देत आहे‘, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिली आहे.