अभिनेता आमिर खानविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानपुरातले वकील मनोजकुमार दीक्षित यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आमिरवर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात आता पुढील सुनावणी १ डिसेंबरला होणार आहे. आपल्या पत्नीनं आपल्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्याचे वक्तव्य आमिरने एका कार्यक्रमात केले होते. त्यानंतर त्याच्यावर चहूबाजूंनी टीका झाली होती. आता तर त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला.
देशात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आमिर खानने नवीन वादाला तोड फोडलं असलं तरी यापूर्वीही आमिर खानने अनेक वेळ वाद ओढावून घेतले आहेत. असंवेदनशील आणि विपर्यास असं आमिरने या सिनेमाचं वर्णन केलं होतं. त्यामुळे आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या शाब्दीक वाद रंगला होता. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिश्ट म्हणून जरी आमिर खानची ख्याती असली तरी अनेक वेळा त्याने वाद निर्माण केला आहे.