भारतामधून अमेरिकेला पाठविलेला जवळपास 4 कोटी 28 लाख किंमतीचा आंबा तेथील विमानतळावरील त्रुटींमुळे स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे. अमेरिकेली यंत्रणांनी नकार दिल्याने हा सर्व नाशवंत माल तिथेच नष्ट करावा लागला असून, निर्यातदारांना नुकसान सहन करावं लागलं आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात फळमालाचं नुकसान झाल्याने परदेशात आंबा निर्यात करण्याची प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे.
नवी मुंबईत विशेष केंद्र
अमेरिकेला आंबा निर्यात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकीरण केंद्र सुरू केले आहे. येथे अमेरिकन अधिका-यांच्या उपस्थितीमध्ये आंब्यावर विकीरण प्रक्रिया केली जाते. याच माध्यमातून हा आंबा पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.