भारत पाकिस्तान युद्ध थांबलं? शस्त्रसंधीसाठी दोन्ही देशांचं एकमत; पाकिस्तानच्या मंत्र्याची पोस्ट

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिलं आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जात असताना, भारताने मात्र ते परतून लावले आहेत. मात्र आता भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याची माहिती समोर येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तसंच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशक डार यांनीही पोस्ट शेअर करत याला दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *