मुंबईकर दररोज खातात ९ ग्रॅम मीठ, मुंबई महानगरपालिकेचे ‘मीठ व साखर जनजागृती’ अभियान

मीठाशिवाय अन्नाला चव नाही हे खरे असले तरी जेवणातील मिठाचा अतिवापर हा सुद्धा आरोग्यासाठी हानिकारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय व्यक्ती अपेक्षित ५ ग्रामपेक्षा जास्त मिठाचे सेवन करतात. तर मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मीठाचे सेवन करतात. त्यामुळे रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी मुंबई महापालिकेने मीठ व साखर जनजागृती’ अभियानाचा संकल्प सोडला आहे.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत ‘मीठ व साखर जनजागृती’ या अभियानाला प्रारंभ झाला. याप्रसंगी ‘मीठ व साखर जनजागृती’ अभियानाच्या भित्तीफलकाचे प्रकाशन करण्यात आले. मुंबईकरांच्या आहारामध्ये प्रतिदिन वापरल्या जाणाऱ्या मिठाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश भूषण गगराणी यांनी या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *