अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून हे वादळ आता कमकुवत झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, या वादळाचा परिणाम म्हणून मुंबईतील समुद्र खवळला आहे. वरळी सी फेसला उंचच उंच लाटा निर्माण होत असून समुद्रात मोठी भरती निर्माण झाली आहे. परिणामी, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून हे वादळ आता कमकुवत झाले असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार १५ जून रोजी बिपरजॉय हे चक्रीवादळ ताशी १२५ ते १३५ किमी वेगाने गुजरात आणि पाकिस्तानला धडकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, या वादळाचा परिणाम म्हणून मुंबईतील समुद्र खवळला आहे. वरळी सी फेसला उंचच उंच लाटा निर्माण होत असून समुद्रात मोठी भरती निर्माण झाली आहे. परिणामी, मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
